Saturday, September 25, 2010

अनुभव आणि व्यवहार याची सांगड घातल्याशिवाय कोणतीही विद्या पूर्ण होत नाही.

अनुभव आणि व्यवहार याची सांगड घातल्याशिवाय कोणतीही विद्या पूर्ण होत नाही.
       - असे म्हटले आहे न. वी. गाडगीळ यांनी. आणि हे अगदी खरेच आहे. एखादी पदवी घेतली म्हणजे आपण काही तज्ञ होत नाही. त्यासाठी अनुभवाचे धडे घ्यावे लागतात.

युथफूल महासंस्कृती : भाग-४

युथफूल महासंस्कृती : भाग-४

Friday, September 24, 2010

महाभारता मधील व्यवस्थापन शास्त्र. Management Skills From Mahabharta.

महाभारताची कथा प्रचंड गुंतागुंतीची आहे. या महाकाव्यातील प्रत्येक पात्राला अंतत: दु:खं आणि नुकसान सोसावे लागते. १८ दिवसांच्या भीषण महायुद्धानंतर खरा विजय कोणाच्याच हाती लागला नाही. कुरुवंश जवळजवळ संपल्यात जमा झाला. एकसमयावच्छेदे करून, महाभारतकार असेही सांगतात, की तरीही जीवन जगायलाच हवे, वर्तमानाला धैर्याने सामोरे जायलाच हवे. नीती, तत्त्व, दुराभिमान, तडजोड, इत्यादींपासून सुटका नाही. निवड करणं महाकठीण असतं. तरीही निवड करायलाच हवी. जीवनाकडे बघण्याचा हा अस्तित्ववादी दृष्टिकोन आहे. सार्थनी म्हटल्याप्रमाणे मॅन इज कंडेम्ड टू बी फ्री, अ‍ॅण्ड फ्रीडम नेसेसरिली मिन्स मेकिंग चॉइस. अ‍ॅण्ड दि चॉइस इज टू बी मेड इन द प्रेझेण्ट. चित्र पूर्ण नसले किंवा निष्पत्ती स्पष्ट नसली तरी निर्णय घ्यावेच लागतात. म्हणूनच व्यवस्थापकांसाठी महाभारत एक उपयुक्त आणि अमूल्य ठेवा आहे.
आता आपण महाभारतातील दोन प्रसंगांकडे वळू या. युद्ध अटळ आहे. असे ठरल्यावर कौरव आणि पांडव या दोघांनी सेनापतींची निवड कशी केली? दुर्योधनाने आपल्या अधिकारात भीष्म यांची नेमणूक केली आणि मतभेद उफाळून आले. कर्ण म्हणाला, जोवर भीष्म सेनापती असतील तोवर मी युद्धा भाग घेणार नाही. युद्धिष्ठिराने मात्र श्रीकृष्णाचा सल्ला घेण्याचे ठरविले. सर्व जण एकत्रित जमले. श्रीकृष्णाने प्रथम ही चर्चा केली, की सेनापतीमध्ये कोणते गुण पाहिजे. त्याची बलस्थानं पाहिली पाहिजेत. त्यावर आधारून एक प्राथमिक यादी तयार करण्यात आली. प्रत्येक नावाबद्दल चर्चा झाली. शेवटी दोनच नावं उरली. एक अर्जुन आणि दुसरा धृष्टदन्मुम्न- द्रौपदीचा भाऊ. श्रीकृष्णाने कारणासहित आपली पसंती धृष्टदन्मुम्नसाठी सांगितली एका प्रकारे स्वॉट (रहडळ) अ‍ॅनालिसिस करण्यात आले. श्रीकृष्णाने ‘कन्सलटेटिव्ह प्रोसेस’ आणि ‘इनक्लुझिव्ह मेथड’ यांचा उपयोग निर्णय घेण्यासाठी केला. या निर्णयाला साहजिकच सर्वतोमुखी पाठिंबा मिळाला. दुसरा प्रसंग आहे, मद्र देशाचा राजा शल्य (नकुल आणि सहदेवचा मामा) दुर्योधनाच्या बाजूला जाण्याचा. तो पांडवांच्या बाजूने लढण्यासाठी मद्र देशातून हस्तिनापुरास येण्यासाठी निघाला. वाटेत दुर्योधनातर्फे त्याची इतकी खातिरदारी करण्यात आली, की पाहुणचाराची परतफेड म्हणून तो कौरवांच्या बाजूला गेला. याच ग्रंथात, श्रीकृष्णाने अर्जुनाला (वाचा, व्यवस्थापकांना) दिलेल्या जगप्रसिद्ध सल्ला आहे. कर्मावर लक्ष केंद्रित कर, निष्पत्तीवर नको. लेखकांना खात्रीपूर्वक असं वाटतं, की व्यवस्थापकांना साहित्यातून मार्गदर्शन मिळू शकतं.

लोकसत्ता मधून साकार.

धर्माच भांडण धर्माशी नसतं, अधर्माशी असतं.

धर्माच भांडण धर्माशी नसतं, अधर्माशी असतं.
निरनिराळे धर्म म्हणजे पूर्णत्वाकडे जाणारे वेगवेगळे मार्ग आहेत. सर्व नद्या ज्याप्रमाणे समुद्रला मिळतात त्याप्रमाणे सर्व धर्म ईश्वराकडे येतात. तेंवा धर्माच झगडा धर्माशी असूच शकत नाही. ते अज्ञानाच लक्षण आहे. धर्माच भांडण अधर्म व अनीती बरोबर असत.

Thursday, September 23, 2010

युथफूल महासंस्कृती-३ : सांस्कृतिक शिक्षणाचा बहुआयामी समन्वय

युथफूल महासंस्कृती-३ : सांस्कृतिक शिक्षणाचा बहुआयामी समन्वय गेल्या ५० वर्षांत भाषिक आणि एकूण सामाजिक परिस्थितीत घडलेले बदल, तसेच माहिती तंत्रज्ञानामुळे विकसित झालेली संपर्कसाधने इत्यादी बाबी लक्षात घेऊन मराठी भाषेसाठी वापरल्या जाणाऱ्या देवनागरी लिपीच्या लेखनपद्धतीमध्ये काही बदल करणे ही काळाची गरज बनली आहे. हा बदल करताना पूर्वापार मराठी लेखनपद्धतीमधील काळानुरूप स्वीकारार्ह भाग कायम ठेवून मराठी भाषा व्यवहारोपयोगी आणि अधिक समृद्ध करण्याकरिता लेखनपद्धतीचे नियम अधिक तर्कसंगत आणि लवचिक करण्यात येतील. लेखनपद्धतीच्या संदर्भात जुन्या विचारांचे योग्य भान ठेवून नवीन प्रवाहाचे स्वागत करणारे अभ्यासक/ तज्ज्ञ यांच्या अभ्यासगटांमार्फत लेखनपद्धतीचे नवे नियम ठरविण्यात येतील, तसेच मराठीतील विशिष्ट शब्द, वाक्यप्रयोग इत्यादीचा वापर करण्याच्या बाबतीतही पुनíवचार केला जाईल.

प्राचीन लेखन साहित्य

प्राचीन लेखन साहित्य आदी मानवाने हळूहळू प्रगती करून भाषा बनवली. मग लिपी विकसित झाली. पुढे मानव लिहू लागला. पण या सर्व सुधारणा व प्रगती अगदी संथ गतीने व गरजेपोटी होत गेल्या, ज्यात हजारो वर्षे खर्ची पडली. आज आपण प्रगत मानव म्हणून अभिमानाने जगतो, पण त्या मागे मानवाची जिद्द व तपश्चर्या फारच मोठी आहे. जुना मानव लिहीत कशा प्रकारे होता? त्याची साधने काय होती हे कुतूहल आपल्या सर्वानाच आहे.

बाय बाय बाप्पा !

बाय बाय बाप्पा !

Wednesday, September 22, 2010

आपल्याला माहित आहे का सगळ्या बाँबांचा बाप हा जगातील सगळ्यात मोठा विस्फोटक बाँब आहे ?

एव्हियेशन थर्मोबेरिक बॉम्ब ऑफ इन्क्रिझ्ड पॉवर ऊर्फ सगळ्या बाँबांचा बाप (रशियन: Авиационная вакуумная бомба повышенной мощности (АВБПМ) ) हा रशियात तयार होणारा हवेतून टाकण्यात येणारा व जमिनीवर फुटणारा बाँब आहे.
अमेरिकन सैन्याने तयार केलेल्या मासिव्ह ऑर्डनन्स एर ब्लास्ट बाँब (MOAB) या बाँबापेक्षा याची विस्फोटक्षमता चौपट आहे. अमेरिकन बाँब मदर ऑफ ऑल बाँब्स या नावाने ओळखला जात असल्यामुळे या बाँबाला सगळ्या बाँबांचा बाप असे उपनाव देण्यात आले आहे.

ह्या हवाबंद कुपीतून तयार होणारी उर्जा ४४ टन टीएनटी इतकी आहे. ही उर्जा बनवण्यासाठी ७.८ टन नवीन प्रकारच्या उच्च विस्फोटकाची गरज असते. हे विस्फोटक नॅनो तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनवले आहे. ११ सप्टेंबर २००७ रोजी ह्या बाँबची यशस्वी चाचणी घेण्यात आली.


परिमाणमासिव्ह ऑर्डनन्स एर ब्लास्ट बाँबएव्हियेशन थर्मोबेरिक बाँब ऑफ इन्क्रिझ्ड पॉवर
वजन:८,२०० किलो.७,१०० किलो.
टीएनटी विस्फोटक्षमता:११ tons / २०,००० Ib~४४ tons / ८०,००० Ib
स्फ़ोट त्रिज्या :१५० मी. (५०० फूट)३०० मी. (१,००० फूट)
दिग्दर्शन:INS/GPSUnknown

Friday, September 17, 2010

शमी मंदार

गणपतीला जशा दूर्वा प्रिय तशीच शमी-मंदारही प्रिय असल्याचे सर्वांना माहित आहेच. शमीचे झाड हे उंच वाढते. त्याच्या सर्वांगाला काटे असतात. हे काटे म्हणजे अर्जुनाचे बाण असेही मानले जाते. कारण पांडवांनी अज्ञातवासात जातांना आपली शस्त्रे शमीवृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवली होती, अशी कथा महाभारतात आहे. त्यातील अर्जुनाच्या बाणांचे प्रतीक म्हणजे हे काटे असावेत.

शमीची पाने ही दुष्कृत्ये आणि दु:स्वप्ननाशक मानली जातात, तशीच ती मंगलदायकही समजतात. म्हणूनच दसर्‍याला शमीवृक्षाची पूजा करुन सीमोल्लंघन केले जाते. अशी ही शमी आणि तिच्या जोडीला मंदार या दोन्ही वृक्षांची पाने गणपतीला प्रिय का वाटू लागली ?त्याचीही एक कथा आहे.

ही कथा नारदऋषींनी इंद्राला सांगितली होती. वीतिहोत्र नगरीत औरव नावाचा महाविद्वान ब्राम्हण आपल्या परमधार्मिक वृत्तीच्या सुमेधा नामक पत्नीसह सुखाने संसार करीत होता. शमीका ही त्यांची मुलगी अतिशय सुंदर, गुणी होती. तिच्यावर त्या दोघांचे निरतिशय प्रेम होते. ती लहान असतानाच धौम्यऋषींच्या बुद्धिमान आणि श्रद्धाळू अशा मंदार नावाच्या मुलाबरोबर तिचा विवाह झाला. त्या दोघांचा संसारही अतिशय सुखासमाधानात चालला होता. एकदा काही कामानिमित्त जात असताना भ्रुशुंडीऋषी वाटेतच असणार्‍या मंदारच्या आश्रमात आले. भ्रुशुंडींना दोन भुवयांमध्ये सोंड तर होतीच, पण ते अंगाने चांगलेच स्थूलदेखील होते. त्यांचे ते रुप आणि तो स्थूल देह पाहून न राहावून मंदार आणि शमी हसू लागली. हे दाम्पत्य आपल्याला हसताना पाहून भ्रुंशुंडी रागावले. त्यांनी त्या रागाच्या भरात शमी-मंदारला तुम्ही दोघे वृक्ष व्हाल, तुम्हाला भरपूर काटे असतील. त्यामुळे एकही पक्षी तुमच्या आश्रयाला कधी येणार नाही, असा शाप दिला. त्क्षणी शमी-मंदार झाडे बनली. असा एक महिना गेला. आपल्या प्रिय शिष्याचे काहीच कुशल वर्तमान न समजल्याने मंदारचे गुरु शौनकऋषी हे औरवाच्या घरी आले. पण त्यांनाही त्या दोघांबद्दल काही ठाऊक नव्हते. तेव्हा शौनक ध्यानस्थ बसले. त्यांनी अंतर्ज्ञानाने भ्रुशंडीच्या शापाने त्या दोघांचे वृक्ष झाल्याचे जाणले. त्या दोघांची शापातून मुक्तता व्हावी म्हणून शौनक आणि औरव या दोघांनी बारा वर्षे गणेशाची आराधना केली. त्यांच्या आराधनेने प्रसन्न होऊन गणपतीने त्यांना दर्शन दिले. मात्र भ्रुशुंडी या आपल्या परमभक्ताचा शाप खोटा ठरु शकणार नाही, असे सांगून त्यामधून एक मार्ग दाखविला. तो म्हणजे त्या दिवसापासून आपण स्वत: मंदार वृक्षाच्या मुळाखाली वास्तव्य करु, तसेच शमीपत्रे आपल्याला प्रिय होतील. त्यामुळे जो कोणी आपल्या मूर्तीची स्थापना मंदार वृक्षाखाली करुन त्यावर शमीपत्रे आणि दूर्वा वाहून आपली पूजा करील त्याचे मनोरथ पूर्ण होतील. इतकेच नव्हे तर मंदार वृक्ष, शमीपत्र आणि दूर्वा या तिघांचे मिलन हा एक महायोग समजला जाईल, असे सांगितले. त्या दिवसापासून गणेशपूजनात शमी-मंदार-दूर्वा यांना अनन्य स्थान प्राप्त झाले.

शमीवर गजाननाचे असलेले प्रेम दुसर्‍या एका कथेतून प्रत्यक्ष भगवान महादेवांनी पार्वतीला सांगितले आहे. अतिशय कीर्तिवान आणि महाप्रतापी अशी प्रियव्रत राजाची एक पत्नी कीर्ती ही पतीची नावडती होती. तिला जेव्हा छळ असह्य झाला, तेव्हा ती प्राणत्याग करण्यास सिद्ध झाली. त्या वेळी तिच्या देवल नावाच्या पुरोहिताने तिला त्यापासून परावृत्त करुन गणेशोपासना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने मंदार वृक्षाच्या वाळलेल्या लाकडापासून गणपतीची मूर्ती करवून घेऊन गणपतीच्या पूजेला प्रारंभ केला. एक दिवस बरेच शोधूनही दूर्वा न मिळाल्याने तिने हाती लागलेल्या शमीपत्रांनीच गणपतीची पूजा केली. त्याने प्रसन्न होऊन गणपतीने तिला आशीर्वाद दिला. त्यानंतर तिचे दुदैवाचे दिवस संपले. ती राजाची प्रिय पत्नी बनली. तिला झालेला क्षिप्रप्रसादन हा मुलगा पुढे गणपतीचा परमभक्त म्हणून प्रसिद्ध झाला.

ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
'महान्यूज'मधील मजकूर.

Tuesday, September 14, 2010

अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.

अभ्यासाचा  कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.
अर्थ : अभ्यास म्हणजे सहजपणे एखादी शिकवण वारंवार उजळणे, अशा डोळस उजळनितून  चांगल्या गोष्टींचा जन्म होतो. अभ्यासाशिवाय भाग्यादय होणे अशक्यच आहे. अभ्यास हि उत्कर्षाची गुरुकिल्ली आहे.        

Monday, September 13, 2010

गणपति बाप्पा तूच सुखकर्ता आहेस.


गणरायाचे आगमन झालेले आहे. टाळ, झांजा, पखवाज, ढोल, ताशा अशा विविध वाद्यांच्या गजरात गणरायाची गाणी आणि आरत्या सुरू झालेल्या आहेत. विद्येसोबत गणरायही कलेची आराध्यदेवता आहे. लोकनायक, गणनायक गणेश नृत्य करीत असल्याचा उल्लेख विविध ग्रंथांमध्ये आढळतात. संत तुकाराम महाराजांनीही गणपतीवर केलेल्या अभंगात म्हटले आहे.

                                                                'नाचत आले हो गणपती
पायी घागु-या वाजती'

'गणराया लवकर येई भेटी सकळांशी देई' या अभंगात संत तुकारामांनी गणपतीच्या रूपाचे वर्णन केले आहे व पुढे 'विठ्ठल गणपती दुजा नाही' असे म्हटले आहे. गणपती हा नाचत येतो असे तुकारामांनी म्हटले आहे. यावरूनच गणपतीचे लोकरंगनायक, नर्तक हे रूप स्पष्ट होते. भेदिकाद्वारे आध्यात्मिक कुटे सादर करणारे कलगीपक्ष आणि तुरापक्षाचे शाहीर गणाच्या उत्पत्तीसंबंधीही परस्परांना कूट प्रश्न विचारीत असत हे पठ्ठे बापूराव आणि भाऊ फक्कड यांच्या गणांवरून स्पष्ट होते. 'गणपती नाचून गेल्यावरती शेंदूर वाहू यक्षिणीप्रती' असे उत्तर दुसर्या एका गणातून भाऊ फक्कड यांनी दिले आहे. गणपती ही यक्षकुळातील देवता असल्याचे भाऊ फक्कड यांना ज्ञात होते. यावरून कलगी-तुर्याच्या या रचनाकारांची व्युत्पन्नता ध्यानी येते. गणांची निर्मिती करताना या गणाद्वारे परस्परांना आव्हान देण्याचा गानप्रकार म्हणूनही या रचनाकारांनी गणांचे उपयोजन केले. पठ्ठे बापूरावांचा हा गण पहा-

लवकर यावे सिध्द गणेशा
आतमधी कीर्तन वरूनी तमाशा
माझा भरवसा तुम्हावरी खासा
विघ्न पिटविशी दाही दिशा
झेंडा मिरवशी आकाश पाताळी
वैरी करिती खाली मिशा
पठ्ठे बापूराव कवीच्या कवनी
बाजारबुणग्यांचा झाला हशा

पठ्ठे बापूराव हे कलगीपक्षाचे शाहीर होते. त्यांनी या गणातून तुरेवाल्या शाहिरांना भेदिकाच्या लढतीत नामुष्की पत्करावी लागेल असा हल्ला चढविला आहे. 'वैरी करिती खाली मिशा' ही ओळ त्याचेच द्योतक आहे. तुर्रेवाल्यांना 'बाजारबुणगे` असे संबोधून त्यांचा हशा झाला असल्याची प्रतिक्रिया पठ्ठे बापूरावांनी नोंदविली आहे. अषा रितीने गणांच्या निर्मितीतही कलगी-तुरा संघर्षाचे नाटयमय सूचन झालेले आहे. जागरणासारख्या विधिनाटयांमधून अशा स्वरूपाचे गण सादर होतात, पण भेदिकाच्या लढतीचे स्वरूप तेथे नसते. तर गणपतीचे संकीर्तन एवढाच मर्यादित हेतू असतो.
गणांतील गणपती हा कधी बालरूपात, कधी विद्येचा अधिपती, कधी सकळ कलांचा अधिपती, कधी विघ्नविनाशक अशा स्वरूपांत येतो. या गौरीनंदन अशा गणपतीचे शंकरराव जाधव-धामणीकर यांनी शब्दबध्द केलेले रूप् पाहा-

आज वंदन करितो, गौरी नंदना
नवविध विद्या करितो भक्ती
भक्तासी द्यावी मुक्ती
हीच आमुची सर्व शक्ती लावितो पणा।।१।।
चौदा विद्येचा गणपती । चौसष्ट कला तुझे हाती
बालकासी द्यावी स्फूर्ती । गावया गुणा ।।२।।
नमो तुज सरस्वती । ब्रम्हा वीणा घेऊन होती ।
स्वर गायनाने डुलती सभा रंगणा
शाहीर शंकर करी गर्जना । रक्षी रक्षी भक्ता जना ।
बबन नामदेव दावा । अंतरी खुणा

गौरीच्या नंदनाची आराधना करताना भक्तही बालक होतात व 'बालकासी द्यावी स्फूर्ती` असे आशीर्वचन मागतात.
गणपती 'विघ्नहार्ता' असल्याने तो रणात निश्चित तारून नेईल अशी श्रध्दा गणाद्वारे व्यक्त केली जाते. गणपतीचे योध्दा म्हणून असलेले रूप् मार्तंड भैरव व मणिमल्ल दैत्यांच्या युध्दात आपण आधी पाहिले आहेच. उल्कामुख दैत्याचा वध करणारा गणपती रणात रक्षण करील या श्रध्देपोटी शंकरराव जाधव-धामणीकर यांनी रचलेल्या गणातील हे वर्णन पहा.-

या गणा या या रणा या । विघ्न हारा या तुरा या ।।धृ।।
तुझ्याच स्मरणी जग हे तरले । अखंड व्यापुनी त्रिखंड उरले ।
दुखंड मनाला कधी न पुरले । पाखंड मनाला माराया ।।१।।
काम, क्रोध अनिवार । होतो मजवर मारा फार ।
पडेल कार्याचा हा भार । जडल रोग तो बाराया ।।२।।
ऋध्दी-सिध्दीचा तू सागर । दु:ख क्लेश हाराय ।
विकल्पबुध्दीचा हा घोर । ज्ञान अमृत पाजावा ।।३।।
कवि शंकर म्हणे कृपासिंधु । दीननाथा दीन बंधू ।
वारंवार तुजशी वंदू । दु:ख क्लेश हाराया ।।४।।

गणांच्या सादरीकरणामागे जे आशयसूत्र दिसते ते असे-

१) कार्यारंभी गणाचे वंदन आशीर्वचन प्राप्तीसाठी करावे.
२) गणेश ही सकल कलांची देवता आहे. कलेच्या प्रारंभीच या देवतेकडून रंगउर्जा घ्यावी.
३) अरिष्टांचे निवारण व्हावे म्हणून गणपतीचा धावा करावा. ही अरिष्टे दोन प्रकारची असतात. भौतिक पातळीवरची आणि आधिभौतिक पातळीवरची. भौतिक अरिष्टे म्हणजे आर्थिक आपत्ती, रोगराई इत्यादी व आधिभौतिक आरिष्टे म्हणजे काम, क्रोध आदी शड्रिपूंपासून अभय प्राप्त व्हावे म्हणून गण सादर करणे.
४) गणातून 'गणा'शी आणि 'गणां'शी संवाद. गण म्हणजे व्यक्तींचा समूह. या समूहाशी संवाद साधण्याचा आरंभ गणाद्वारे व प्रत्यक्ष गणपतीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असतो. अनेक गणांमध्ये सादरकर्ता, म्हणजेच उपासक येथे गणपतीशी संवाद साधतोय व आशीर्वचन मिळतेय हे आशयसूत्र असते.

गोधळ, जागरण, तमाशा आदी लोककला प्रकारांत संकीर्तन स्वरूपातील 'गण` दशावतार, लळीत यासारख्या भक्तिनाटयात प्रत्यक्ष स्वरूपात अवतरतो. हा गणेश 'नृत्यगणेश' होय.

प्रा.डॉ. प्रकाश खांडगे
महान्यूज'मधील मजकूर.

शब्दात भाव असेल तर शब्दांना भाव मिळेल.

शब्दात भाव असेल तर शब्दांना भाव मिळेल.
अर्थ : उपदेशामागे  अनुरूप आचारनाची तपश्चर्या असेल, त्यातील शब्धानमागे अत्मनिष्ठेचे पाठबळ  असेल तर त्या शब्धाना मंत्र अक्षरांचे  सामर्थ्य येते. शब्ध केवळ ओठा तुन  न येता रुदयातुन आले पाहिजेत.  

Sunday, September 12, 2010

अपल्यामधिल एकही दोष लक्षात न येने, हाच सर्वात मोठा दोष आहे.

अपल्यामधिल एकही दोष लक्षात न येने, हाच सर्वात मोठा दोष आहे.
अर्थ : मानुस अपुरा असतो. तो परिपूर्ण नाही हेच सत्य आहे. प्रत्येकाचे कोनतेतरी  दोषस्थान असतेच. हे ज्याला जाणवत नाही, तोच त्याचा मोठा दोष, अपुरेपना ठरतो.

Saturday, September 11, 2010

अहंकार ही माणसाची कुबड़ी असते.

अहंकार ही माणसाची कुबड़ी असते.
अर्थ : ज्याला काहीही  माहिती नाही मोठेपणा नाही तो मानुस आपल्याला जगाने मोठे म्हणावे यासाठी खोट्या अहंकराला फुलवतो. अहंकार अद्न्यानातुन  निर्माण होतो व तो माणसाला पंगु बनवतो. 

गणेशोत्सवाची धूम आजपासून सुरु.

कोणत्याही शुभकर्यच्या प्रसंगी अग्रपुजेचा मान गणपतीला असतो. गणेशाचे सुखकर्ता- दुखहर्ता असे स्वरुप आहे. त्याची अनेक नवे आहेत. त्यापैकी गणपति हे रूढ़ आणि प्रचलित नव आहे.  आशा गणपतीचा किंवा गणेशाचा उत्सव भाद्रपद शुक्ल चतुर्थिपासुंन  अनंतचतुर्दशीपर्यंत असतो. त्यालाच आपन गणेशोत्सव म्हणतो.

आज प्रात:काळापासून हे ओथंबणार्‍या उत्साहाचे प्रसन्न वातावरण का बरे आहे? आज प्रत्येक मराठी घरात, मग ते घर मराठीच्या माहेरी महाराष्ट्रात असो वा सातासमुद्रापलीकडे कुठल्या विदेशात असो, एका अबोध आनंदाचा सुगंध का बरे दरवळत आहे ? दिवस पावसाचे असल्यामुळे पाण्याचा पूर येणे समजू शकते. पण हा उत्साहाचा महापूर कशाचे द्योतक आहे ? सूर्य जसजसा वर येत आहे तसतसा वाढणारा हा आनंद, हा उत्साह, हा उत्साह, हा जल्लोष, कशाचा आहे ?


अरे, कशाचा आहे म्हणून काय विचारता ? गेली हजारो वर्षे आजच्या दिवशी पूर्वेच्या उंबरठय़ावर पाऊल टाकणारा तेजोभास्कर आनंदाची लयलूट करीत येतो. गेली शेकडो वर्षे हा दिवस महाराष्ट्राच्या नाक्यानाक्यावर, गल्लीगल्लीवर उत्साहाचा गुलाल सहस्त्रहस्तांनी दाही दिशांना उधळत येतो.

हा दिवसच तसा महत्त्वाचा आहे. आपल्या कुठल्याही मंगलकार्याचा प्रारंभ मग तो शिक्षणाचा शुभारंभ असो, विवाहासारख्या मंगलकार्याचा प्रारंभ असो, धार्मिक, सामाजिक कुठलेही काम असो, ज्याला सर्वप्रथम वंदन केले जाते, ज्याचे सर्वप्रथम स्मरण केले जाते त्या गणेश, गजानन, गणपतीचा आज जन्मदिवस आहे.

हा गणपती विविध अवतार घेऊन या भारतवर्षात अवतरला दुष्टदुर्जनांनी साधुसंतांना सळो की पळो करुन सोडले, निरपराध जनता त्रस्त, भयग्रस्त झाली त्या त्या वेळी व त्या त्या युगाला साजतील अशी आयुधे घेऊन हा प्रतिकूलतेशी लढा देण्यास सिद्ध झाला. ह्याने जिथे म्हणून छळवणूक असेल तिथे तिथे याची दमदार पावले विरोधकांचा नायनाट करण्यासाठी सतत अग्रभागी वावरली.

युध्द नसेल त्या वेळी लोकांच्या अंगातील गुण हेरुन त्यांना उत्तेजन देण्याचे कार्य ह्या गुणवंत गणेशाने केले. हा खाण्यात रंगला, हा कलारंगात दंग झाला, हा युद्धात विजयी झाला, हा संसारात समरस झाला. पराक्रम करावा आणि पराक्रम करुन मिळविलेले ऐश्वर्य, वैभव सत्कृत्यांना उत्तेजन देण्यात कामी आणावे, असाच जणू ह्याचा रिवाज. हा गोरगरिबांचा कनवाळू, आपल्या खर्‍या भक्तांवर, आपल्याला मदत करणार्‍या सैन्यातील सैनिकांवर ह्याची नेहमी कृपादृष्टी कपट-कारस्थानी दुष्टांशी लढताना ह्याने त्यांच्याच मार्गाने त्यांना पराभूत केले. उदंड यशप्राप्ती झाल्यानंतर एका विजयोत्सवी मिरवणुकीत ह्याला एका कोपर्‍यात उभा असलेला शुक्ल नावाचा भक्त दिसला. इतर सर्व थोरामाठय़ांकडील आदरसत्कार नाकारुन हा त्या गरीब, सद्भावी अंत:करणाच्या भक्ताच्या घरी जाऊन पेज जेवला.

अवघड काळात माणसाने पुडील पिढय़ांसमोर ठेवला. आजही हा सद्भावपूर्ण अंत:करणाने भक्ती करणार्‍यांना पावतो. ते बाजूला असले, कोपर्‍यात असले तरी ह्याचे त्यांच्याकडे नेमके लक्ष असते. अशा ह्याचा जन्मोत्सव पिढय़ान्पिढय़ा, शतकानुशतके अत्यानंदाच्या वर्षावात न्हाऊन साजरा केला जाऊ लागला.

ह्याचा जन्म म्हणजे दुराचारांचा अंत, ह्याचा जन्म म्हणजे नवयुगाची प्रभात, याचा जन्म म्हणजे अंधकारात सापडलेल्यांना प्रकाशाचे किरण. तो जन्म ज्या तिथीला झाला ती ही आजची तिथी. मग ती उत्साहात न्हाऊन निघाली तर काय आश्चर्य ?

  • ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
  • From Mahanews.

Friday, September 10, 2010

मदतीचा हात तुमच्या मनगट| जवळ असतो. Suvichar.

मदतीचा हात तुमच्या मनगट| जवळ  असतो.
अर्थ : यशस्वी होण्यासाठी जे सामर्थ्य लागते ते अपल्यातच असते. देवावर, दैवावर अथवा दुसरयावर अवलंबून न रहता जो स्वतावर अवलंबून राहतो तोच पराक्रम करतो. जो दुसरयावर विसंबतो त्याचा कार्यभाग बुडतो. आत्मनिर्भर होवून स्वताच स्वताचा विकास घडवून अनावा.

रमजान ईद उत्साहात साजरा / ramjan ed.

रमजान महिन्यातील उपवासाच्या व्रताची संगता करण्याचा सन म्हणजे रमजान ईद. रमजान हा मुस्लिम वर्षातील नववा महिना. हा महिना पवित्र मनाला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव सम्पूर्ण पाने उपवास करतात. त्याला 'रोजा' म्हणतात. रोजा केल्याने पापक्षालन होते आणि  स्वर्गप्राप्ति होते असे मानले जाते.

Mahakrushi: बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Fes...

Mahakrushi: बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Fes...: "बैल पोळा हा असा सन आहे, की या दिवशी शेतकरी आपल्या साठी काम करणारे जे बैल आहेत त्याच्याविषयी कृत्द्न्यता व्यक्त करतो. त्यांचे पूजन करतो त्याच..."