परंपरागत व्यवसायाच्या क्षेत्रामधील संधींच्या अभावामुळे अनेक तरुणांना स्वत:चे उद्योग निर्माण करून उपजीविकेचे साधन निर्माण करावे लागले आहे. ज्यांना नोकरीधंदा मिळू शकला नाही ते आपल्या स्वत:च्या कौशल्याचा व कसबाचा उपयोग करून नवीन रोजगार निर्माण करीत आहेत. याव्यतिरिक्त अनेक तरुण चांगली नोकरी सोडून स्वत:चे व्यवसाय सुरू करीत आहेत आणि हे क्षेत्र आज झपाटय़ाने विस्तारित होत आहे. दीर्घकाळामध्ये होणारे मोठे लाभ व आपली उद्दिष्टे ठरविण्याचे स्वातंत्र्य ही यामागची दोन प्रमुख मार्गदर्शक तत्त्वे आहेत.
No comments:
Post a Comment